वासूद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या जयश्री केदार यांची निवड
वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून वासूद गावाच्या सर्वांगीण व चौफेर विकासासाठी कटिबध्द आहे.
गावातील रस्ते, वीज, पाणी, स्वच्छ्ता गावचा विकास साधण्यासाठी विविध विकास कामांबरोबरच आरोग्य व शैक्षणिक सुविधा उत्तम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सरपंच, उपसरपंच यासह सदस्यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत पोहोचवावीत. येत्या काळात जीवनातील महत्त्वाच्या निर्णयात आमूलाग्र बदल होऊन आणखी चांगल्या प्रकारची व्यवस्था दिसेल.
भाजपच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच. ग्रामस्थांचे आशिर्वाद कायम ठेवा. गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केला.



0 Comments