तलावात बुडून ५ महिलांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा समावेश!
लातूर: लातूर जिल्ह्यातील किनगाव गावाजवळील तलावात बुडून पाच महिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.मृत्यू झालेली व्यक्तींमध्ये एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा समावेश आहे.दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यातील काही मजूर अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर साखर कारखाना येथे ऊसतोडीसाठी आले होते.
त्यातील पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील सुषमा संजय राठोड, अरुणा गंगाधर राठोड तर याच तालुक्यातील रामपूर तांडा येथील राधाबाई धोंडिबा आडे आणि त्यांच्या मुली काजल धोंडिबा आडे आणि दीक्षा धोंडिबा आडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, घटनास्थळी किनगाव पोलीस दाखल झाले असून सदर घटनेचा पुढील तपास ते करत आहेत.
0 Comments