google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व. मा.आ.गणपतराव देशमुख चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन "या" तारखेला " येथे" होणार

Breaking News

स्व. मा.आ.गणपतराव देशमुख चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन "या" तारखेला " येथे" होणार

 स्व. मा.आ.गणपतराव देशमुख चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन "या" तारखेला " येथे" होणार

स्व. मा.आ.गणपतराव देशमुख चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन दि.23/7/2022 व 24/7/2022 रोजी सांगोला येथे होणार आहे, असे स्वागताध्यक्ष संजय शिंगाडेंनी जाहीर केले आहे. सांगोला(जि.सोलापुर) येथे रविवार दिनांक १/५/२०२२ रोजी स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख, चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.बैठकीस राज्यभरातील निवडक साहित्य प्रेमी, बौद्धिक मंडळी उपस्थित होती.


अध्यक्ष स्थानी सम्मेलन आध्यक्ष प्राचार्य आर एस चोपड़े सर होते तर प्रमुख उपस्थिती संमेलनाचे संस्थापक डॉ. अभिमन्यु टकले, ज्ञानेश्वर ढोमणे (अमरावती),अशोक हटकर (बुलढाणा) हे होते. कामगार दिनानिमित्त MPSC पास झालेले अधिकारी व मान्यवरचा सत्कार सोहळा पार पडला.कु भाग्यश्री ढोन राजपत्रित गट अ जलसंधारण विभाग निवड. राजपत्रित गट ब मध्ये कु. पल्लवी निळगुंडे ,कु सायली हाके ,डॉ योगेश्वरी आलदर , श्री नितीन आलदार ,डॉ अविनाश उत्तम खांडेकर यांना गौरविण्यात आले.


 प्राचार्य विजयकुमार वाघमोडे, शेंडगे यांचा आदर्श प्राचार्य म्हणून सत्कार करण्यात आला.पत्रकार भाग्यवंत ल.नायकुडे यांना नवी दिल्ली येथे विश्वरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवार्डने गौरविण्यात आले निमित्त व आबासाहेब मोटे आर एस पी पार्टीचे राज्य सचिव झाले म्हणून अभिनंदन व सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित

सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. साहित्य संमेलन रूप रेषा कशी असावी यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.


मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यु टकले म्हणाले सयोजन समितीला जी योग्य तारीख वाटेल ती ठरवावी .तसेच जो पर्यन्त धनगर समाज्यातील बौद्धिक लोक निस्वार्थ पणे जमाती साठी काम करणार नाहीत तो पर्यत कोणालाही काहीही मिळणार नाही. अडीच कोटी मतदार असलेल्या समाजाचे नेते जो पर्यंत एका व्यासपीठावर येणार नाहीत तो पर्यंत त्यांचा वापरच होणार आहे. धनगर जमात एक होण्यासाठी तयार आहे. लीडरशिप साठी तयार आहे. पोटभरु वैयक्तिक घरभरु नेते समाज्याचे कधीही भले करू शकत नाहीत. 


भविष्यात राज्यस्तरीय जमात एक होत आहे.आदिवासी धनगर साहित्यातील मान्यवरांनी सामाजिक, राजकीय बदल घडून आणले आहेत.जमात बोलू लिहू लागली आहे. हे साहित्य संमेलन झाल्या नंतर राज्यात मोठे सामाजिक बदल होतील हे सांगण्याची गरज नाही. २०१४ पासून आपण निर्णायक भूमीकेत आहोत. साहित्य संमेलन सयोंजन समितीला नियोजनाचे पूर्ण अधिकार आहेत . योग्य तारीख निश्चित करावी. कोणत्याही आघाडीवर एकटे लढू नक़ा लवकर संपून जाल. हे साहित्य संमेलन राज्य आणि देशात बदल घडवणारे भव्य दिव्य होणार हे नक्कीच.


बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी अनेक सुझाव दिले ते सयोंजन समितीने मान्य केले.बाळासाहेब कर्णवर पाटील म्हणाले आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार सुरु करा. जे समाज्याचे नेते पत्रिकेत नाव टाकून येत नाहीत त्यांची नावे टाकू नयेत. जे नावे टाकायला लावतात त्यांनीच त्यांना आण्यासाठी जावे. जेथे कमी तेथे आम्ही. जी जबाबदारी देणार ती घेऊ असेही ते म्हणाले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निंमत्रण देण्याची जबाबदारी व मुख्यमंत्री पुरस्कार याची जबाबदारी घेणार असल्याचेही ते म्हणाले.


नियोजित संमेलन अध्यक्ष आर एस चोपड़े म्हणाले व्यासपीठ असल्या शिवाय व्यक़्त होता येत नाही. तसेच कोणाचे कौतुक करता येत नाही.यासाठीच डॉ अभिमन्यु टकले यांनी हे व्यासपीठ तयार केले आहे. आणि बदल घडत आहेत. आज आपण या सर्व अधिकारी तरुणांचे सत्कार, अभिनंदन या व्यासपीठावर केले. या संमेलना मुळे आज मलाही व्यासपीठ मिळाले आहे.या व्यासपीठाचे परिणाम आम्ही २०१७ पासून पहत आहोत. आणि येणाऱ्या काही वर्षात याचे परिणाम समाजात पहायला मिळणार आहेत.


तसेच सर्व अधिकारी कर्मचारी बौद्धिक वर्ग सम्मेलनात एकवटला आणि डॉ.टकलें सारखे निस्वार्थपणे समाज सेवा केली तर समाज्याची प्रगती झाल्या शिवाय राहणार नाही. तसेच या संमेलनाला काहीही कमी पडू देणार नाही.आमच्या संस्थे मधे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तीनसे,चारसे स्टाफ आहे ,.रथ यात्रा ,दिंडी , सांस्कृतिक कार्यक्रम जबाबदारी आमची आहे . काहीही कमतरता भासु दिली जाणार नाही. तसेच साहित्य संमेलंनात पुढारी लुडबुड नको. 


निस्पक्ष काम करणारे,साहित्याची आवड असणारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सुशीलकुमार शिंदे असे मान्यवर बोलवावेत. या संमेलनात अहिल्या शिक्षण संस्था पूर्ण क्षमतेने उतरणार आहे. संमेलन तारीख २३/२४ जुलै २०२२ ठेवण्यात यावी. अशी सूचनाही चोपड़े यांनी केली.

कृषि उत्पन्न बाजार समिती बुलढाणा चे सभापती अशोक हटकर हे म्हणाले पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन जाहीर झाल्यानंतर आम्हाला खुप आनंद झाला होता. 


संमेलन झाले आणि खुप चांगला उपक्रम सुरु झाला आहे. आपल्या समाज्यात जात्यावरची गाणी,धनगरी ओवी , असे अनेक साहित्याचे अनेक प्रकार आहेत ते जतन केले जावेत. अमरावती धनगर धर्मपीठ व अमरावती वधूवर सूचक प्रमुख ज्ञानेश्वर ढोमणे म्हणाले त्यांनी अमरावती येथे समाजाची अनेक विकास कामे संस्था स्थापन करून , समाज्याचा विकास करत आहेत.


 त्यानी विविध विकास कामे केली त्याची माहिती सांगितली. पुढे बोलताना ते म्हणाले आदिवासी धनगर साहित्य सम्मलेन हे महाराष्ट्र राज्यात चर्चेत आहेच, परन्तु हे संमेलन देशातील अनेक राज्यात फिरत असतना या संमेलनाबदल चर्चा केली ज़ाते. त्यामुळे राज्यबाहेरील लोक ही संमेलनाला येण्यास उत्सुक आहेत असेही ते म्हणाले. विदर्भ विभागात जी जबाबदारी दिली जाईल ती स्वीकारली जाईल असे अश्वासन त्यांनी दिले.


संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय शिंगाडे समारोप करताना म्हणाले साहित्य संमेलनात शिस्त असेल. संमेलन स्थळ लवकरच जाहिर केले जाईल.साहित्य संमेलनाचे २३/७/२०२२ व २४/७/२०२२ लाच होणार आहे. केंद्रीय राज्य मंत्री कवी रामदास आठवले हे उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच शे.का.प.चे जयंतराव पाटील यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच सर्व साहित्यिक यांच्या सहकार्यानी पत्रिका तयार करणार आहे.


स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या नावाच्या उंची सारखेच सम्मलेन घेवू. तसेच लवकरच पुरस्कार समिती नेमली जाईल. पुरस्कार आदर्श शेतकरी,पालक,पत्रकार , अधिकारी ,लोकप्रतिनीधी साहित्यिक यांना दिला जाईल. दिनांक २३/७ /२०२२ व २४ /७ २०२२ या साहित्यसम्मेलन कार्यक्रम तारखा एकमताने जाहीर करून राज्यस्तरीय बैठक संपली. लवकरच सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन संमेलनाची रुपरेखा जाहीर केली जाईल. बंडोपंत येडगे यांनी आभार व्यक्त केले.


चौथ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची तारीख घोषित करण्याच्या चर्चा बैठकीसाठी खालील मान्यवर उपस्थित होते.

प्रा.डॉ. अभिमन्यु टकले(संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य),श्री. श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी चे व्हा.चेअरमन व संमेलनाचे मार्गदर्शक बाळासाहेब कर्णवर पाटील, श्री अहिल्या शिक्षण संस्था सांगली चे अध्यक्ष व ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे,उज्ज्वलकुमार माने (संपादक दैनिक तरूण भारत सोलापूर),


सदस्य.संयोजन समिती धनगर साहित्य संमेलन सांगोला,संजय शिंगाडे(स्वागताध्यक्ष तथा प्रमुख संयोजन समिती ४थे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य) शिवाजी बंडगर (कवी सम्मेलन अध्यक्ष),कुंडलीक आलदर संयोजक.डाॅ.उषा देशमुख,राजेंद्र देशमुख, विष्णु देशमुख (कार्याध्यक्ष), प्राचार्य रामचंद्र जानकर (खजिनदार),कृष्णा बुरूंगुले संचालक सदस्य,


सन्माननीय सदस्य डाॅ.रमेश सिद, भीवा कांबळे,सुबराव बंडगर, आबासाहेब मोटे, प्रा.बाळकृष्ण कोकरे, बंडोपंत येडगे, दत्तात्रय जानकर,विजयकुमार वाघमोडे, दिगंबर बंटी लवटे,अमोल खरात,उल्हास धायगुडे,प्रवीण वाघमोडे,मोहन मस्के पत्रकार, प्रा.बापूराया शिंदे,ज्ञानेश्वर ढोमणे (धनगर धर्म पीठ जिल्हाध्यक्ष आमरावती),


 अशोक हटकर (सभापती बाजार समिती खामगाव बुलढाणा),पत्रकार भाग्यवंत ल. नायकुडे(संस्थापक संपादक अकलूज वैभव, अकलूज),बाळासाहेब टकले जि.संघटक धनगर धर्म पीठ करमाळा,विठ्ठल सजगने (जिल्हाप्रमुख धनगर धर्म पीठ सातारा),गणेश पुजारी पत्रकार पुणे,अशोक माने पत्रकार पुणे,असे अनेक जमातीचे मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments