पब्जी गेममध्ये एकमेकांना हरवण्यावरुन तीन मित्रानीचं मिळुन केली आपल्या जीवलग मित्राची हत्या…..
ठाणे : दि : 2 ( मार्च ) पब्जी खेळाच्या वादातून वर्तकनगरात मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पब्जी या जीवघेण्या खेळाचं भूत तरुणाईच्या मानगुटीवरून उतरण्याची चिन्ह काही दिसत नाहीत.केंद्र सरकारनं या गेमवर बंदी घातल्यानंतर,पब्जी बॅन केल्यामुळे तरुणाईत निराशा झाली. दरम्यान, हा गेम पुन्हा नव्या रुपात भारतात लॉन्च करण्यात आला.तरुणाई पुन्हा एकदा ह्या गेमच्या जाळ्यात अडकण्यास सुरुवात झाली….
यापूर्वीही ह्या गेम मुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत…आता ठाण्यातही या गेम मुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. खेळाच्या वादातून मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. साईल जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी प्रणव कोळी याला न्यायालयानं 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाण्यातील वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिर परिसरात असलेल्या जुनी पाईपलाईनजवळ आरोपी प्रणव कोळी आणि दोन्ही अल्पवयीन मुलं राहतात. त्याच भागात राहणाऱ्या मृत साईलसोबत या तिघांचा पब्जी खेळात एकमेकांना हरवण्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही गेलं होतं. मात्र त्यावेळी त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं होतं. अखेर दोन दिवसांपूर्वी रात्री जानकादेवी मंदिर परिसरात प्रणव आणि इतर दोन अल्पवयीन मुलांचा साईलसोबत पुन्हा वाद झाला. यावेळी या तिघांनी चाकू, सुरे, तलवारींनी भोसकून साईलची निर्घृण हत्या केली. या प्रकारानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, साईलच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मुख्य आरोपी प्रणव याला अटकही करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे…
0 Comments