शासनाच्या आदेशाची प्रत घेऊनच वसुली अथवा वीज खंडित करणेत यावी- डॉ . बाबासाहेब देशमुख
सांगोला ( प्रतिनिधी ) : - विज ग्राहकाचा विज पुरवठा खंडीत करण्यापूर्वी विज कायद्यानुसार विजवितरण कंपनीने ग्राहकाला १५ दिवस अगोदर नोटीस देणे बंधन कारक आहे . या नुसार नोटीस दिल्याशिवाय शेतीपंपाची वसुली व विज पुरवठा खंडीत करू नये व शेतीपंपाची बीज खंडीत करावयाची असलेस शासनाच्या आदेशाची प्रत घेऊनच बसुली अथवा बीज खंडित करणेत यावी , अशी मागणी शेकापचे डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे .
महावितरण कंपनीकडून शेती पंपाची बीज जोडणी खंडित करणार असल्याच्या तक्रारी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून ऐकावयास मिळत आहेत . शेतकन्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळून जात आहे .
कोरोना व हवामानातील बदलामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अगोदरच कंबरडे अधिच मोडले असून सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधव सध्या खूप अडचणीत आला आहे . महावितरणकडून केल्या जाणान्या कमी दाबाच्या बीज पुरवठ्यामुळे संकटात सापडला आहे .
विहिरीत पाणी असूनही विजेच्या लपंडावाने पिकांना ते देता येत नसल्याने नैसर्गिक आपत्तीनंतर महावितरण निर्मित आपत्ती शेतकन्यांवर ओढवली असल्याने शेतकन्यांमधून महावितरण विरोधात आधीच संतापाचे वातावरण तयार झाले आहे . बीज खंडीत केल्यामुळे शेतकन्यांच्या जनावरांचे पिकांचे , बागांचे पाण्याअभावी खूप मोठे नुकसान होणार आहे .
बीज खंडीत करून वसुली करणे हा योग्य मार्ग नसून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडीत करण्याचे परिपत्रक / जीआर आहे का ? सांगोला तालुक्यातील शेतकल्यांचा हातातोंडाशी आलेले पीक किडींच्या प्रादुर्भावामुळे उध्दवस्त होत चालले आहे .
अपार कष्ट करून भरून काढण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचे वीज प्रवाह बीज वितरण कंपनी प्रशासनाने खंडित करु नये . महावितरण विभागाने मनमानी कारभार न करता तालुक्यातील शेतकरी बांधवांशी चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढला पाहिजे , असे आवाहन डॉ . देशमुख यांनी केले आहे .
0 Comments