धक्कादायक | मरवडे येथे विषबाधेने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू
मंगळवेढा | बाहेर दुकानातील खाऊ खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली त्यामध्ये दुर्देवाने दोन चिमुकल्यांचा यात मृत्यू झाला ही खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावात घडली. भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय- 6) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय-4) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की मयत मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलींसाठी मंगळवेढा येथील एका दुकानातून खाऊ आणला होता तो खाऊ घरातील चौघांनीही खाल्ला त्यानंतर चव्हाण कुटुंबियातील सर्वांनाच त्रास होऊ लागल्याने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले त्यामध्ये उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी मध्यरात्री पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात झाला. मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.

0 Comments