सांगोला नगरपरिषद निवडणूक शेकापक्ष पूर्ण ताकतीने स्वबळावर लढवेल : चंद्रकांतदादा देशमुख
सांगोला प्रतिनिधी: सांगोला शहरातील नगरपरिषद निवडणूक महत्वाची आहे कार्यकर्त्यांनी जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करून कामाला लागावे प्रत्येक वार्डात एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी आहे ती अजून सक्षम करून येणारी निवडणूक सर्व ताकतीने स्वबळावर लढवूया असे शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख यांनी बुधवार दि 8 सप्टेंबर रोजी सांगोला येथील शेकाप कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख, चिटणीस विठ्ठल शिंदे,मारुतीआबा बनकर,सुरेश माळी,रफिक तांबोळी,राजू मगर,गोविंद माळी, अवधूत कुमठेकर,औदुंबर सपाटे,बाळासाहेब झपके, डॉ महेश राऊत,बिरुदेव शिंगाडे,अजित गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मा आ कै गणपतराव देशमुख यांनी सांगोला शहरासाठी पुढील 50 वर्षाचे काम केले आहे त्यांच्या दूरदृष्टीने शहराचा चौफेर विकास झाला आहे नगरपरिषद निवडणुकीत फसवणूक करणाऱ्या सोबत युती नाही,आबासाहेबानी शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य लोकांसाठी खूप काम केले आहे ज्यांना ज्या पद्धतीने जायचं त्यांना जाऊ द्या,निवडणुकीत कार्यकर्त्यांना निष्ठेनं काम करावे लागेल,येणाऱ्या सर्वच निवडणुकीत विजय हीच आबासाहेब यांना खरी श्रद्धांजली असेल ,युती आघाडीमुळे पक्ष विस्कळीत झाला,आघाडीचा विचार सोडून देऊ या व येणाऱ्या सर्व निवडणूक स्वबळावर लढवूया प्रत्येक वार्डात कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करू या असे शेकाप चिटणीस विठ्ठलराव शिंदे यांनी सांगितले
कै मा आ देशमुख यांनी शहरासाठी भीमा नदीचे पाणी आणले त्यामुळे शहराचा चौफेर विकास झाला निवडणुकीत उमेदवार जनतेतून दिला जाईल,सर्वसमावेशक उमेदवार असेल आबासाहेब यांनी डोंगरा एवढं काम केलं आहे शहरात शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी नगरपरिषद निवडणूक महत्वाची आहे प्रत्येक वार्डात बैठक घ्या येणारी निवडणूक स्वबळावर लढवूया असे चंद्रकांत देशमुख यांनी सांगितले यावेळी मारुतीआबा बनकर,डॉ प्रभाकर माळी, सुरेश माळी डॉ महेश राऊत,बाळासाहेब बनसोडे, बाळासाहेब झपके यांनी विचार मांडले तर नीलकंठ लिंगे यांनी प्रास्ताविक केले व मधुकर कांबळे यांनी आभार मानले.
0 Comments