google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व.मा.आम. गणपतरावजी देशमुख यांनी शेकाप पक्षाला कामाची दिशा दिली : एस. व्ही. जाधव

Breaking News

स्व.मा.आम. गणपतरावजी देशमुख यांनी शेकाप पक्षाला कामाची दिशा दिली : एस. व्ही. जाधव

 स्व.मा.आम. गणपतरावजी देशमुख यांनी शेकाप पक्षाला कामाची दिशा दिली : एस. व्ही. जाधव  


सांगोला / प्रतिनिधी : शेकापक्षाचे स्वर्गीय माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाला कामाची दिशा दिली असे सांगून दाभाडी प्रबंधाच्या माध्यमातून मार्क्सवाद व लेनिन वाद शेकाप पक्षाने स्वीकारला शोषणमुक्त समाज निर्माण करणारा शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर जागृत झाला पाहिजे. या ध्येयाने शेकाप पक्षाची स्थापना झाल्याचे विचार शेकाप पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य एस. व्ही. जाधव यांनी व्यक्त केले.


शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीच्या दोन दिवसीय अधिवेशनास काल शनिवारी सांगोल्यात सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये शेकाप आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार बाळाराम पाटील, राजेंद्र कोरडे, माजी आमदार संपतराव पाटील, शेकापचे नेते चंद्रकांतदादा देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, चिटणीस विठ्ठलराव शिंदे, मा. सभापती बाळासाहेब काटकर, पंचायत समिती सभापती राणी कोळवले, उपसभापती नारायण जगताप, अँड सचिन देशमुख, सूतगिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे, बाबासाहेब कराडे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, मारुतीआबा बनकर, खरेदी-विक्री संघाचे पी. डी. जाधव, सभापती गिरीश गंगथडे यांच्यासह शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिटणीस जयंत पाटील यांनी स्वर्गीय माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानिमित्त ठराव मांडल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


एस. व्ही.जाधव मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, आम. जयंत पाटील यांनी गेल्या महिन्या पासून शेकाप पक्षाला सक्रिय करून पक्ष संघटनेमध्ये तरुणांचा सहभाग वाढविला आहे. डाव्या पक्षांचे मूल्यमापन करताना अनेक विचारवंतांनी पुस्तके लिहिली आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा जन्म खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून झाला आहे. सर्व सामान्य जनतेला जाती गुलामगिरी मधून बाहेर काढायचे शाहू-फुले-आंबेडकर म. फुले यांच्या विचारांचा प्रभाव वाढवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची निर्मिती झाली असे सांगून शेकाप पक्षांनी पुरोगामी युवक संघटना, विद्यार्थी संघटना, शेतकरी संस्था, महिला संघटनांसह इतर आघाड्या उभा करून पक्ष विस्ताराचे काम केले पाहिजे. त्याचप्रमाणे पक्ष संघटनेसाठी सभासद नोंदणी कडेही लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या दोन दिवसाच्या अधिवेशनासाठी अलिबाग, पेण, पनवेल, तुळजापुर, लातुर, सांगली, नाशिक, जळगाव, पुणे, कर्जत, पाली, रोहा, अकोला, कोल्हापूर, अमरावती, इगतपुरी, शेगाव, परभणी, पैठण, पिंपरी चिंचवड, मुखेड या भागातून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाई चंद्रकांत दादा देशमुख यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments