google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उजनीच्या २ टीएमसी पाण्यातून सांगोला उपसा सिंचन योजनेच्या अद्यावत ड्रोन पद्धतीने सर्व्हेक्षणाच्या कामाचा आज शुभारंभ आ.शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम

Breaking News

उजनीच्या २ टीएमसी पाण्यातून सांगोला उपसा सिंचन योजनेच्या अद्यावत ड्रोन पद्धतीने सर्व्हेक्षणाच्या कामाचा आज शुभारंभ आ.शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम

 उजनीच्या २ टीएमसी पाण्यातून सांगोला उपसा सिंचन योजनेच्या अद्यावत ड्रोन पद्धतीने सर्व्हेक्षणाच्या कामाचा आज शुभारंभ  आ.शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम


सांगोला (प्रतिनिधी):- सन १९९८ साली सांगोला तालुक्यासाठी मंजुर झालेले उजनी धरणातील २ टीएमसी पाणी गेली २३ वर्षे रखडले होते. सन २००० साली प्रशासकीय मान्यता मिळालेल्या व त्याकाळी ७५ कोटी रुपये अंदाजित खर्च असणाऱ्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला कोणताही निधी न मिळाल्याने सन २००५ साली या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द झाली होती व सन २००५ सालानंतर ही योजना पुर्णपणे रद्द झाल्याचे वाटत होते.


सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी जनतेला शब्द दिल्याप्रमाणे या योजनेचे पुर्न: जीवन करण्याचे ठरवून या योजनेचा सतत पाठपुरावा चालू केला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील कोणत्याही योजनेत समाविष्ठ नसलेल्या १२ वंचीत गावांना दीड टीएमसी व नीरा उजवा कालवा योजनेतील शेवटच्या भागात कमी पाणी मिळणाऱ्या गावांना उर्वरीत अर्धा टीएमसी असे एकूण २ टीएमसी पाणी सांगोला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मंजुर करण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत निर्णय घेऊन सदर योजनेच्या कामाचे त्वरीत सर्व्हेक्षण करून आराखडे व अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते.

त्यामुळे सांगोला तालुक्यातील १२ वंचीत गावे व कमी पाणी मिळणारी नीरा लाभक्षेत्रातील गावांचा या योजनेमध्ये समाविष्ठ करून या कामाचे अद्यावत ड्रोनच्या सहाय्याने सर्व्हेक्षण करण्याची सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चाची निविदा मंजूर झाली असून शनिवार दि.४ सप्टेंबर रोजी दु. ४ वा. लोटेवाडी येथे या कामाचा शुभारंभ आ. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.


या योजनेचा इटकी, कटफळ,जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी, चिकमहुद, खवासपूर अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, लक्ष्मीनगर, अजनाळे व यलमार मंगेवाडी या १२ गावांना मोठा फायदा होणार असून बंदीस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेचा अंदाजे खर्च ६०० ते ७०० कोटी रुपये इतका होण्याची शक्यता आहे. या बहुप्रतिक्षीत योजनेच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात होत असल्याने लवकरच या योजनेच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळून योजनेचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे.


या सर्व्हेक्षणाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी प्रा. पी. सी. झपके, भाऊसाहेब रुपनर, संभाजीराजे शिंदे, यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस (आय) पक्षाचे सर्व पदाधिकारी, जि.प. सदस्य पंचायत

समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच इ.

मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील या योजनेला मंजूरी मिळवून निधी उपलब्ध करणार असल्याने सांगोला तालुक्यातील या १२ गावांचा अनेक वर्षे प्रलंबीत असणारा पाणी प्रश्न मात्र कायमस्वरूपी संपणार असल्याचे मत कार्यक्रमाचे संयोजक युवक नेते दादासाहेब लवटे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments