google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खुशखबर: पालकांनो शाळेतील संपूर्ण फी भरू नका ! आता ठाकरे सरकारने आदेशच काढला

Breaking News

खुशखबर: पालकांनो शाळेतील संपूर्ण फी भरू नका ! आता ठाकरे सरकारने आदेशच काढला

 खुशखबर: पालकांनो शाळेतील संपूर्ण फी भरू नका ! आता ठाकरे सरकारने आदेशच काढला


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच आर्थिक गणित कोलमडले आहे. पालक वर्गही शाळेच्या फी बाबत चिंतेत आहे.परंतु त्यांची हि चिंता ठाकरे सरकारने मिटवली आहे. आता शाळेच्या फी बाबत सरकाने एक जीआर काढला आहे.राज्य सरकारने खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. 

पण या निर्णयाचा जीआर काढण्यात आला नव्हता.अखेर या निर्णयाचा जीआर काढण्यात आला आहे. त्यामुळे या जीआरनुसार आता 2021-2022 या शैक्षणिक वर्षात 15 टक्क्यांची फी कपात करण्यात आली आहे.त्याचबरोबर ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे त्यांना शाळेकडून 15 टक्के फी परत मिळेल. त्यामुळे पालकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.28 जुलै रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खाजगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

त्यानंतर कायद्यात बदल करण्यासाठी याबाबतचा अध्यादेश काढला जाणार होता.आता याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. जीआरनुसार खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.2021-22 या वर्षासाठी ही सवलत मिळणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते.यावर 3 आठवड्यात आदेश देण्याचंही न्यायालयाने 22 जुलै रोजी सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments