कोल्हापुरला महापुराचा धोका ; NDRF ची टीम रवाना
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोल्हापुर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली आहे . त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे . याच पार्श्वभूमीवर पुण्याहून कोल्हापूर कडे NDRF दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत .कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे . प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे . महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे . आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले .मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे . 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी असून सध्या नदीची पातळी 36 फूट आहे . धोक्याची पाणी पातळी गाठण्यासाठी पंचगंगा नदीत 4 फूट पाणी कमी आहे . त्यामुळे जिल्ह्यात असाच पाऊस राहिल्यास पंचगंगा नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल .
0 Comments