google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्घटना : मासेमारीसाठी गेलेली तीन भांवडे लुणीसह बुडाली , दोन भावड अद्याप बेपत्ता आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील घटना

Breaking News

दुर्घटना : मासेमारीसाठी गेलेली तीन भांवडे लुणीसह बुडाली , दोन भावड अद्याप बेपत्ता आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील घटना

 सांगली | आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील एकाच कुटुंबातील दोन सख्खे , एक चुलत भाऊ आणि त्यांचा कुत्राही कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची रविवारी दि . 6 जूनला घटना घडली आहे . 

मासेमारीसाठी गेलेल्या भांवडापैकी एकाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला असून कुत्रा लुशीचाही मृत्यू झाला आहे .


परंतु यांच्या मृत्यू कसा झाला , यांचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे . रात्री उशिरा घटनास्थळी पाणबुडे दाखल झाले असून सोमवारी सकाळपासून मुलांचा शोध घेण्याचे काम चालू आहे . घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी , की टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात आले आहे . तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते . सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते . त्याच्यालगतच अंकुश व्हनमाने व लहू व्हनमाने या दोन सख्ख्या भावांची शेतजमीन आहे . लगतच कालव्यातून पाणी वाहते . रविवारी दुपारी तीनला घरातील कुत्रे सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय अंकुश व्हनमाने ( वय १६ ) , आनंदा अंकुश व्हनमाने ( १५ ) हे सख्खे आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने ( १७ ) गेले होते . सायंकाळी सहापर्यंत घरी परतले नाहीत . त्यामुळे कुटुंबीय , शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली

मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला . एक बादली , त्याला बांधलेला दोरही सापडला . वैभवची माहिती मिळाली नाही . गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली आहे . रात्री साडेआठला घटनास्थळी घटनास्थळी तहसीलदार सचिन मुळीक , पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे दाखल झाले . पोलिस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोध घेतला . मात्र , पाण्याचा प्रवाह जादा व वेगात असल्याने मुलांचा तपास लागला नाही . दरम्यान , सांगलीहून पाण्यात बुडून शोध घेणारे पाणबुडे दाखल झाले आहेत . त्यांनी मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला . एक बादली , त्याला बांधलेला दोरही सापडला . वैभवची माहिती मिळाली नाही . गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली आहे . रात्री साडेआठला घटनास्थळी घटनास्थळी तहसीलदार सचिन मुळीक , पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे दाखल झाले . पोलिस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोध घेतला . मात्र , पाण्याचा प्रवाह जादा व वेगात असल्याने मुलांचा तपास लागला नाही . दरम्यान , सांगलीहून पाण्यात बुडून शोध घेणारे पाणबुडे दाखल झाले आहेत . त्यांनी अंधारातच मुलांचा शोध सुरू केला . या घटनेने गावात आणि तालुक्यात खळबळ उडाली .

Post a Comment

0 Comments