जर कर्जदाराचा मृत्यू झाला , तर त्या कर्जाचं काय होतं ? माफ होतं की , कुणाला द्यावं लागतं ?
जून ०६ , २०२१ जर कर्जदाराचा मृत्यू झाला , तर त्या कर्जाचं काय होतं ? माफ होतं की , कुणाला द्यावं लागतं ? दि . ६ जून २०२१ अनेकदा विविध कारणांसाठी बँकेतून कर्ज घेतलं जातं . कर्ज घेण्यामागे अनेक कारणं असतात . गृहकर्ज , वाहन कर्ज , वैयक्तिक कर्ज , विवाह कर्ज या आणि अशा विविध कारणांसाठी बँक कर्जपुरवठा करते . मात्र कर्ज घेतल्यानंतर कर्जफेड कशी करायची या किंवा विविध कारणांमुळे कर्जधारकाचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्यात .
मात्र कर्जधारकाचा मृत्यूनंतर कर्जाची उर्वरित रक्कम कोण भरतं , असा प्रश्न आतापर्यंत अनेकांना पडला असेल . याबाबतचे नियम काय आहेत , हे आपण जाणून घेणार आहोत . नियम काय आहेत ? कर्जधारकाच्या मृत्यू पश्चात विविध कर्जासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत . कोणत्या कर्जात कर्जधारकाच्या मृत्यूनंतर कोणाला उर्वरित रक्कम द्यावी लागते , याबाबतचे कर्जनिहाय नियम कसे आहेत हे जाणून घेऊयात . गृहकर्जाबाबत नियम काय ? गृहकर्ज घेताना संबंधित व्यक्तीकडून बँक त्याच्याकडून घराचे कागदपत्र आपल्या ताब्यात घेते . गृह कर्ज घेतलेल्या व्यक्तीचं मृत्यू झाल्यास उर्वरित कर्जाचे हफ्ते हे कर्जधारकाच्या जवळच्या व्यक्तीला द्यावे लागतात . किंवा कर्जधारकाचा उत्तराधिकारी हे हफ्ते भरण्यास सक्षम असेल तर तो हे कर्ज फेडू शकतो . याशिवाय मृत कर्जधारकांच्या कुटुंबियांना त्यांच्याकडे असेलली संपत्ती विकून कर्ज फेडावे लागते . असंही शक्य नसल्यास अखेर बँक त्यांच्याकडे तारण ठेवण्यात आलेली संपत्तीचा लिलाव करते . या रक्कमतून बँक आपली थकित रक्कम वसूल करते . काही बँकांनी यावर चांगला पर्याय शोधून काढला आहे . बँका कर्ज घेताना कर्जधारकाचं विमा काढते . त्यामुळे कर्ज सुरु असताना कर्जधारकाचा मृत्यू झाल्यास बँक उर्वरित रक्कम त्या विम्यातून वसूल करते . त्यामुळे जेव्हा केव्हा गृहकर्जासाठी बँकेकडे अर्ज केला जातो , तेव्हा बँकाकडून विम्याबाबत विचारणा केली जाते .वैयक्तिक कर्जाचे नियम काय सांगतात ? वैयक्तिक कर्ज सुरक्षित कर्ज नसतं . त्यामुळे वैयक्तिक कर्जधारकाचा मृत्यू झाल्यास उर्वरित रक्कमेची वसूली करता येत नाही . तसेच या वैयक्तिक कर्जासाठी कर्जधारकाच्या उत्तराधिकारी जबाबदार नसतो . त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या कर्जधारकाच्या मृत्यूसोबत या कर्जाचा विषय संपतो . वाहन कर्जाबाबत नियम कसे आहेत ? वाहन कर्जही वैयक्तिक कर्जाप्रमाणे सुरक्षित कर्ज नसतं . वाहन कर्ज काढलेल्या व्यक्तीचं मृत्यू झाल्यास बँक कर्जधारकाच्या कुटुंबियांना उर्वरित रक्कम भरण्यास सांगते . मात्र ही रक्कम भरण्यास कुटुंबिय सक्षम नसल्यास बँक संबंधित वाहन विकून आपली रक्कम वसूल करते .
0 Comments