बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सातारा : लॉकडाऊन काळामध्ये काही वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या बंद पडल्या काही ना आपली रोजची नोकरी सोडून घरी बसावे लागले त्यामुळे पत्रकारांना वरती उपासमारीची वेळ आलेली आहे
याचा विचार करून पत्रकारांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
ना. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण दीड वर्षापेक्षा जास्त कोरोनाची महामारी सुरू आहे. कोरोनाच्या महामारी मुळे अनेक व्यवसाय उद्योगावर कुऱ्हाड कोसळली आहे त्यामुळे ते बंद पडलेले आहेत. या व्यवसायातील काही लोकांना आपली रोजची नोकरी सोडावी लागली,त्यामुळे त्यांच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे अशा गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना स्वतंत्ररीत्या पॅकेज जाहीर केली आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे परंतु लॉक डाऊन काळामध्ये बरीच वर्तमानपत्रे बंद पडली, काहींना स्वतंत्र आवृत्त्या बंद कराव्या लागल्या अशावेळी काही पत्रकारांना आपली रोजची नोकरी सोडून घरी बसावे लागले आहे, तर वर्तमानपत्र आवृत्त्या बंद झाल्याने त्या त्या विभागातील फिल्ड वरती काम करणारे वार्ताहर यांच्या बातम्या प्रसिद्ध होणेही बंद झालं, त्यामुळे वार्ताहर च्या बातम्या बंद तर जाहिराती बंद आणि जाहिराती बंद तर जाहिरातीचे कमिशन बंद त्यामुळे ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या वार्ताहरांना आपल्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे,त्यामुळे अशा पत्रकारांना वेळ प्रसंगी सहकुटुंब आत्महत्या कराव्या लागतील या संभाव्य याचा विचार करून विद्यमान मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना स्वतंत्र पॅकेज जाहीर करावी
0 Comments