google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्या – रामदास आठवले

Breaking News

पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्या – रामदास आठवले

 पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्या – रामदास आठवले


मुंबई :  राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना आपल्या जिवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवित असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने “कोविंड फ्रन्टलाइन वॉरियर्स” ( कोरोना योद्ध्याचा ) दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. पत्रकारांना “कोविंड फ्रन्टलाइन वॉरियर्स” अर्थात “कोरणा योद्धा” पदाचा दर्जा पंजाब, मध्य प्रदेश, पश्चीम बंगल, ओरिसा, बिहार या राज्याने दिला आहे. महाराष्ट्राला महनीय पत्रकारांची परंपरा लाभली आहे. ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकारचे पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. लाॅकडॉन च्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये पत्रकारांचा समावेश महा विकास आघाडी सरकारने केलेला नाही. परिणामी पत्रकार आणि कॅमेरामन, फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. अन्य राज्यात पत्रकारांना “कोरना फ्रन्टलाइन वॉरियर्स” दर्जा दिला असताना महाराष्ट्रात पत्रकारांची अत्यावश्यक सेवेत नोंद केली जात नाही. ही खेदजनक बाब आहे. पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महा विकास आघाडी सरकारने करू नये, राज्यातील पत्रकारांना कोरना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोनाच्या बिकट काळात 124 पत्रकारांचा कोरना मुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्यांचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे, तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सांत्वनपर 50 लाख रुपये मदत निधी द्यावा, त्यासाठी “कोविंड फ्रन्टलाइन वॉरियर्स कोरोना योद्धा” म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा. अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

Post a Comment

0 Comments