कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जूनपर्यंत ' जैसे थे ' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती . काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते . पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे .
त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे . दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे . महाराष्ट्रात आज 31,671 रुग्णांना राज्यात आज तर 20,740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे . तर आज 31,671 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . आज 424 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे . राज्यात आज एकूण 2,89,088 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . आजपर्यंत एकूण 53,07,874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 93.24 टक्के एवढे झाले आहे . राज्यात आज 424 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे . सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे . आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,43,50,186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,92,920 ( 16.57 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत . सध्या राज्यात 21,54,976 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 16,078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत . पुणे जिल्ह्यात काही बंधनं काढून टाकली जाणार पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय . पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने काही निर्बंध उठवण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले . यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार आहेत . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते . रेड झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे . सध्या पुण्यातील परिस्थिती समाधानकारक असल्याचे टोपे म्हणाले . परंतु , डेथ रेशो आणि पॉझिटीव्हीटी रेट कमी झालेला नाही . संपुर्ण महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगी शास्त्रीय पद्धतीने वाढवण्यात येणार आहे . ज्या ठिकाणी हाय रिस्क एरिया आहे तिथेच ट्रेसिंग व्हायला हवे . उगीच कुठेही ट्रेसिंग करुन पॉझि टीव्हीटी रेट कमी आहे , असं दाखवता कामा नये .सस्थात्मक विलगीकरण वाढवण्यात येणार होम क्वारंटाईन कमी करुन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवायला हवे , अशी सगळ्या लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे . बऱ्याचवेळा होम क्वारंटाईन असलेला रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहे . त्यामुळे अनेकांनी ही मागणी केली होती . प्रत्येक हॉस्पिटल्सची बिलं तपासण्यासाठी डेडीकेटेड ऑडीटर देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत . अनेक रुग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा बिल आकारली जात आहेत . ऑडीटरने हे रोखावे ही अपेक्षा आहे , असं टोपे म्हणाले .निबंधांमधून सुट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे रुाण उपचार घेतायत . मात्र , अनेक मोठी हॉस्पिटल्स सरकारी योजना त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागू करत नाहीत . त्या कराव्यात यासाठी चॅरीटी कमीशनरांना सुचित करण्यात आलं आहे . मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वतःच्या स्टाफला स्वतःच्या खर्चाने लस द्यावी अशा सुचना औद्योगिक क्षेत्रात देण्यात आल्या आहेत . अनेक खाजगी हॉस्पिटल्स लसीसाठी जास्तीची रक्कम वसूल करतायत . प्रशासनाला त्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आलयाची माहिती टोपे यांनी दिलीय . दरम्यान , संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात येईल . परंतु , निर्बंधांमधून सुट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा असेल , असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले .


0 Comments