वाघोबाला बांधून बेदम मारहाण करत लोककलावंत मुरळीवरती सामुहिक पाशवी बलात्कार;दोन नराधमांना ठोकल्या बेड्या
अहमदनगर शहराजवळील संतापजनक घटना
लोककलावंत महिलेवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेमूळे लोककला क्षेत्राला मोठा घक्का बसला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
कोरोना लॉकडाऊन मूळे लोककलावंत उध्वस्त झाला आहे, शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसताना लोककलावंत मिळेल ते काम करून दोन वेळच्या जेवणाची गरज भागविण्यासाठी धडपड करत असताना लोककलावंत महिलेवर सामूहिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.
गावोगावी जागरण गोंधळ करुन उपजीविका भागविणार्या 25 वर्षीय लोककलावंत(मुरळी) महिलेवर तिघा नराधमांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटनेने महाराष्ट्रातील लोककलावंतामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात 2एप्रिल रोजी रात्री पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन तिघा आरोपींविरोधात बलात्कार,मारहाण या कलमाअंतर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी अक्षय माळी व आकाश पोटे रा.दोघे निंबोडी या दोघा आरोपींना तात्काळ अटक केली.तिसरा आरोपी निलेश पोटे फरार आहे. पीडित लोककलावंत महिला व तिचा आष्टी तालुक्यातील साथीदार हे 1 एप्रिल रोजी नगर – बीड रस्त्यावरुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन जात असताना ते निंबोडी शिवारातील बंद पडलेल्या हाँटेलजवळ लंघुशंकेसाठी थांबले .यावेळी तिघा अरोपींनी या दोघांना अडवून त्यातील एकाने महिलेच्या साथीदाराला कंबर पट्ट्याने मारहाण करुन त्याला बंदी बनविले. यावेळी इतर दोघांनी महिलेच्या केसाला धरुन तिला बाजूला नेत आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा दोघांनी महिलेच्या साथीदाराजवळ थांबून तिसर्या आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.यावेळी आरोपींनी या दोघांकडे असलेले नऊ हजार रुपये व मोबाइल हिसकावून नेला. अचानक घडलेल्या या घटनेमूळे हे दोघे घाबरुन गेले होते.त्यांनी दुसर्या दिवशी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली.या घटनेनंतर भिंगार कँम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिशिरकुमार देशमुख,उपनिरिक्षक बेंडकोळी,पोलीस नाईक राजेंद्र सुद्रिक,व्दारके,अरुण मोरे यांच्या पथकाने दोघा आरोपींना निंबोडी परिसरातून अटक केली. तिसर्या आरोपीचा शोध सुरु आहे.पीडित महिला सातारा जिल्ह्यातील आत्याचाराची बळी ठरलेली पीडित महिला ही मुळची सातारा जिल्ह्यातील आहे. ती जागरणात मुरळी म्हणून काम करत असल्यामूळे ती तिच्या साथीदारासमवेत गावाकडे जात असतांना ही घटना घडली.
0 Comments