google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपले तरीसुद्धा शिक्षकांना सुट्ट्या जाहीर न केल्याने उन्हाळी सुट्टी 1 मे पासून जाहीर करावी ,

Breaking News

ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपले तरीसुद्धा शिक्षकांना सुट्ट्या जाहीर न केल्याने उन्हाळी सुट्टी 1 मे पासून जाहीर करावी ,

 वर्षभरापासून काम करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना 1 मे पासून सुट्टी जाहीर करा ; राज्यातील शिक्षक संघटनांची मागणीविद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेऊन देखील शैक्षणिक वर्ष समाप्त झाल्याची घोषणा शिक्षण विभागाने केली नाही .


शिवाय अनेक शिक्षक अजूनही ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत . आणखी किती दिवस शिक्षकांनी हे वर्ग सुरु ठेवावे ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय . मुंबई , ( दि . 27 एप्रिल ) : मागील वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपले तरीसुद्धा शिक्षकांना सुट्ट्या जाहीर न केल्याने उन्हाळी सुट्टी 1 मे पासून जाहीर करावी ,

अशी मागणी शिक्षकांकडून जोर धरू लागली आहे . इयत्ता 1 ली ते 9 वी वर्गाला शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत . त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर तरी सुट्ट्या जाहीर कराव्यात आणि शिक्षकांना ऑनलाईन कामातून विश्रांती द्यावी , असं शिक्षकांचं म्हणणं आहे . विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेऊन देखील शैक्षणिक वर्ष समाप्त झाल्याची घोषणा शिक्षण विभागाने केली नाही . शिवाय अनेक शिक्षक अजूनही ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत . आणखी किती दिवस शिक्षकांनी हे वर्ग सुरु ठेवावे ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय . ' मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटात राज्यातील शिक्षकांनी वर्षभर अनेक अडचणीन तोंड देत ऑनलाईन शिकवून अभ्यासक्रम पूर्ण केला . शिवाय , काही शिक्षकांना शासनाने सरकारीकामासाठी ' देशातील इतर राज्यात ज्यामध्ये राजस्थान , हरियाणा , पंजाब , तसेच दिल्ली येथे उन्हाळी सुट्टी जाहीर केली असताना राज्यातील शिक्षण विभाग परीक्षेबाबत निर्णय बोलवून काम करून घेतले .' देशातील इतर राज्यात ज्यामध्ये राजस्थान , हरियाणा , पंजाब , तसेच दिल्ली येथे उन्हाळी सुट्टी जाहीर केली असताना राज्यातील शिक्षण विभाग परीक्षेबाबत निर्णय झाल्यानंतर सुद्धा का घेत नाही ? ' असा प्रश्न महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या शिवनाथ दराडे यांनी शिक्षण विभागाला विचारून चार वेळेस मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे . त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या सुट्टीच्या मागणीकडे पाहून शिक्षण विभाग नेमका काय निर्णय घेणार ? हे पाहावे लागणार आहे . असं असताना विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम झाल्यानंतर 1 मे पासून सुट्टी जाहीर करावी ' , अशी मागणी भाजप शिक्षक आघाडी संघटनेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments