google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निर्बंध अधिक कठोर करणार मुख्यमंत्र्यांनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे सूतोवाच !

Breaking News

निर्बंध अधिक कठोर करणार मुख्यमंत्र्यांनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे सूतोवाच !

 निर्बंध अधिक कठोर करणार मुख्यमंत्र्यांनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे सूतोवाच !


निर्बंध अधिक कठोर करणार मुख्यमंत्र्यांनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे सूतोवाच !राज्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात सूतोवाच केले होते.त्यापाठोपाठ आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील निर्बंध कठोर करण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे.“वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचं पालन करून सहकार्य करावं”, असं आवाहन राजेश टोपेंनी राज्यातल्या जनतेला केलं आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या अंशत: लॉकडाऊनची परिस्थिती असताना संपूर्ण राज्यासाठीच तशा प्रकारचे निर्बंध घातले जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांचाही इशारा दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल, उपहारगृहांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना ‘नियम पाळा, कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका’, असा इशारा दिला होता. राज्यातली रुग्णसंख्या आणि बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. देशात सर्वाधित ८६ टक्के नवे करोनाबाधित ७ राज्यांमध्ये सापडत असून त्यामध्ये सर्वाधित सरासरी ५० टक्के बाधित एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. या पार्श्वभूीवर सरकारी पातळीवर खलबतं सुरू असून राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये करोनासंदर्भातले निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, “राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे.पण जनतेनं काळजी घेणं आवश्यक आहे.” यासोबतच, “राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत.

Post a Comment

0 Comments