सांगोला ( प्रतिनिधी ) : - मार्च २०२० पासून कोरोनाने धुमाकुळ घातल्यामुळे तब्बल ११ महिने शाळेपासून लांब राहिल्यानंतर आता पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा नियमितपणे सुरू होणार म्हटल्यावर विद्यार्थी भलतेच खुश झाले आहेत . पण , आता दोन महिन्यांसाठी नवीन गणवेशासंह साहित्य खरेदीच्या आर्थिक ताणाने पालक चांगलेच बिथरले आहेत . तालुक्यातील शाळामधील ५ वी ते ८ वी चे वर्ग करण्यासाठी सर्व शाळा सज्ज झाल्या असल्याचे चित्र सध्या दिसत आहे . इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग बुधवार दि .२७ जानेवारीपासून सुरू करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला . या बातमीने चिमुकल्यांच्या विश्वात आनंदाचे वातावरण आहे . शाळेत जाऊन अभ्यास करण्यापेक्षाही मित्रमैत्रिणींना भेटण , त्यांच्याबरोबर धम्माल करणं अशी विचारात ही चिमुकली आहेत . कोरोनाची लस आली असली तरीही जोपर्यंत लस मिळत नाही तोवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची मानसिकता होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे . ऑलाईन सुरू झालेलं नवीन शैक्षणिक वर्ष याच पद्धतीने संपुष्टात येणार अशी पालकांची धारणा होती . त्यामुळे काहींनी शाळेचे शुल्क भरण्याचे मागे ठेवून तातडीची गरज म्हणून पाल्यासाठी नवीन मोबाईल घेतला . शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पालकांमध्ये आर्थिक जुळवाजुळव करण्याची वेळ आणली आहे . इ .५ वी ते ८ वी विद्यार्थ्यांसाठी ५० टक्केउपस्थिती आवश्यक असणार असून गणित व विज्ञान , इंग्रजी विज्ञान या विषयाचे तास प्रामुख्याने होणार आहे . विद्यार्थ्यांना पालकांची संमती आवश्यक असणार आहे . शाळा सुरु होण्याअगोदर शिक्षकांची देखील कोरोना टेस्ट होणार आहे . गतवर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करीत होते . त्यामुळे शाळेत न जाता गतवर्षी विद्यार्थी उत्तीर्ण झाले . मात्र , जून महिन्यापासून बहुतांश शाळानी नियमित ऑनलाईन वर्ग सुरू करून मर्यादित अभ्यासक्रम घेण्याचे शासनाचे धोरण अवलंबले . अनेकांनी गतवर्षीचे शैक्षणिक शुल्क भरून विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील प्रवेश निश्चित केला ; पण शाळा नियमित सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांनाही त्यासाठी पाठवाव लागणार , तसे केले तर शाळेची फी भरणेही सक्तीचे होणार अशी पालकांच्या मनात धास्ती आहे . परिणामी शाळा सुरू होण्यापेक्षा शुल्काच्या शुक्लकाष्ठची धास्ती पालकांनी घेतली आहे . शाळा सुरू करताना यासाठी पालकांची समती असणे आवश्यक असणार आहे , संसर्गापासून बचावासाठी खबरदारी म्हणून सगळ्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात येणार आहे . कोरोना विषाणूचा नवीन आलेला स्ट्रेन बिमुकल्यांसाठी धोकादायक असल्याची चर्चा असल्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत . कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज असल्याचे सांगण्यात आले



0 Comments