पुणे ( दि .2 नोव्हेंबर ) : - गेले आठ महिण्यापासुन कोरोना लॉकडाऊन मध्ये रात्रंदिवस संपुर्ण भारतामध्ये पत्रकार ठिकठिकाणी जाऊन , गावोगावी चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला , जनतेपर्यत जनतेपर्यत बातमीच्या माध्यमातुन जनजागृतीचे काम केले .
कोरोनामध्ये पत्रकार मरण पावले व त्यांचे संसार उघड्यावर पडले , त्यांना घर चालवणे अवघड झाले आहे.पत्रकारांना विमा ५० लाखा पर्यत मंजुर करण्यात यावा . महाराष्ट्रत सर्व पत्रकारांना मिळावा .जे पत्रकार कोरोनाच्या काळात मरण पावले आहे , त्यांच्या घरच्यांना व कुटुंबातील एकाला शासना तर्फ सरकारी नोकरी मिळावी किंवा त्यांच्या कुटुंबातीला कायम स्वरुपी मानधन चालु करावे ,
शासन कोठ्यातुन निधी मंजुर करावा . असे केसरी मराठवाडा चे पत्रकार कमल कचर कर्डक यांनी सांगितले आहे . पत्रकार व सर्व मीडिया चॅनल संघटनामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देणार आहे . सर्व पत्रकारांना न्याय मिळावा व आम्ही केलेली मागणी मंजुर व्हावी , अशी मराठवाडा केसरीचे पत्रकार कमल कचर कर्डक यांनी केली आहे .



0 Comments