Breaking News

वटपौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला! पंढरपूरमध्ये विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

वटपौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला! पंढरपूरमध्ये विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी अंत


लापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. विजेच्या तीव्र धक्क्यामुळे शेतकरी पतीचा मृत्यू होत

 असताना त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नीचाही करंट लागून जागीच मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला होता. सोमवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण नागणे

 हे भीमा नदी परिसरातील विहिरीवरील शेतीपंपाची वीज बंद करण्यासाठी गेले होते. पावसामुळे परिसरात ओलावा असल्याने मोटार बंद करताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते करंटमध्ये अडकले.

पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच अलका नागणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, विजेचा प्रवाह सुरू असल्याने त्यांनाही जोरदार करंट लागला. त्यामुळे त्या देखील पतीजवळच कोसळल्या. या भीषण दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करण्याची तयारी करत असतानाच तिच्यावर हे मोठे दुःख कोसळले. पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचाही जीव गमावल्याने ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.

या घटनेनंतर आंबेगावसह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, नागणे दाम्पत्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments