google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील नाझरे बंधारा येथील गळती बंद करा अशी शेतकरी वर्गातून मागणी

Breaking News

सांगोला तालुक्यातील नाझरे बंधारा येथील गळती बंद करा अशी शेतकरी वर्गातून मागणी

सांगोला तालुक्यातील नाझरे बंधारा येथील गळती बंद करा अशी शेतकरी वर्गातून मागणी


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

गोला - नाझरे ता.सांगोला येथील मान नदीवरील बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असून, अद्याप दरवाजे न बसवल्याने व त्याची गळती सुरू

 असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.त्यामुळे ताबडतोब दरवाजे टाकून गळती बंद करा व बंधाऱ्याची दुरुस्ती करा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

नाझरे, वझरे, बलवडी या परिसरासाठी हा बंधारा बांधला आहे. आसपासच्या बंधाऱ्याचे दरवाजे टाकले आहेत.

 परंतु नाझरे येथील दरवाजे न बसवल्याने व गळती न रोखल्याने पाणी दरवाजा मधून चिळकांड्या मारीत आहे. 

त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच दरवाजे न टाकल्याने पाऊस पडून उपयोग काय असा प्रश्न शेतकरी वर्गात केला जात आहे.

Post a Comment

0 Comments