विर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नांव मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसींग लींकला द्यावे--आ.डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४७७८१२/८२०८२८४६४७)
विर हुतात्मा शिंग्रोबा धनगर हे धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते.शिंग्रोबा धनगर यांचा इतिहास खंडाळा-बोर घाटाशी जोडलेला आहे.
ते याच खोऱ्यात वास्तवात होते.शिंग्रोबा धनगर यांना डोंगर व दऱ्या खोऱ्याची सखोल माहीती होती.
त्या काळी इंग्रजी अभियंत्याला जे काम जमले नाही ते काम शिंग्रोबा धनगर यांनी केली.
आडाणी असुनही ते अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. त्याकाळी मुंबई पुणे लोहमार्ग व रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला.
घाटातुन रस्ते कसे व कोठुन तयार करायचे हा पेच ब्रिटिश अभियंत्यांना सुध्दा पडला.त्या वेळी ब्रिटिश शासनाला विर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांनी योग्य ती माहिती दिली
व रस्ता कसा व कोठुन तयार करायचा ते सांगीतले.त्याच्या या कामगीरी वर खुष होऊन ब्रिटिश शासनाने त्यांना काही मागा असे सांगितले
मात्र या विर हुतात्म्यांने ब्रिटिशांना सांगितले द्यायचे असेल तर आंम्हाला स्वतंत्र द्या!
त्यांच्या या मागणीने ब्रिटिश शासनाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली.आशा या हुतात्म्यामुळे आज आपणास मुंबई पुणे रस्ता तयार मिळाला आहे.
आजही घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणी विर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे मंदिर आहे. जाणारे येणारे या मंदीरासमोर नतमस्तक होतात.
आशा विर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नांव मुंबई पुणे एक्सप्रेस वरील मिसिंग लींकला द्यावे अशी मागणी
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली


0 Comments