google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..मनोज जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईत दंगली घडवण्याचा डाव; रसद पुरवून..., शहाजीबापू पाटलांनी मविआवर डागली तोफ

Breaking News

मोठी बातमी..मनोज जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईत दंगली घडवण्याचा डाव; रसद पुरवून..., शहाजीबापू पाटलांनी मविआवर डागली तोफ

मोठी बातमी..मनोज जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईत दंगली घडवण्याचा डाव;


रसद पुरवून..., शहाजीबापू पाटलांनी मविआवर डागली तोफ

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला: मनोज दादा जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोचल्यावर दुर्दैवाने काही लोकांनी मुंबईत दंगली घडविण्याचा डाव आखला होता. 

मुख्यमंत्र्यांनी तातडीने दंगलीसाठी रसत पुरविणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शहाजी बापूंनी केली आहे.

मनोज जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोचल्यावर महाविकास आघाडीचे काही मराठा नेत्यांनी असा प्रयत्न केला असल्याचा गौप्यस्फोट शहाजी बापू यांनी केला आहे. 

त्यात नामांकित घराणे आणि त्यातील युवक नेत्याचाही समावेश असल्याचा टोला रोहित पवार यांचे नाव न घेता शहाजी बापू यांनी लगावला आहे.

असं असलं तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय देत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हा प्रश्न सोडवल्याने विरोध करणारे नेते तोंडावर पडले.

 या आंदोलनाला ज्यांनी भाजी भाकरी चांगली रसद पुरवली त्यांना यश आले आणि ज्यांनी दंगली घडविण्यासाठी रसद पुरवली ते तोंडावर पडले 

असा टोला लगावला. तर संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना हा संजय राऊतांचा जळफळाट सुरू असून ते वाटच बघत होते, कधी दंगल पेटती आणि हे सरकार अडचणीत येते.

 मराठा आंदोलन मुंबईत आल्यावर संपूर्ण मुंबईकर विविध पद्धतीची मदत मराठा आंदोलकांना देत असताना लालबागच्या राजाच्या गणपती समोर सुरू असलेली जेवण कोणी बंद केली याचे उत्तर राऊत यांनी द्यावे असा सवाल शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न

दुर्दैवाने हे आंदोलन मुंबईत आल्यानंतर काही विरोधी लोकांनी या दंगल घडवून आणण्याचा आणि महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी अतिशय वेगात केले परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही.

 महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता

 मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला. हे आंदोलन यशस्वी झालं. दुर्दैवाने कपटनीती करणाऱ्या लोकांना यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला होता, 

ते सर्व लोक आज या ठिकाणी उघडे पडले आहेत, माझे स्पष्ट मत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी याची सखोल चौकशी करून यामध्ये कोण समाजकंटक होते 

आणि या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोज जरांगे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, ते शोधून काढावे, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी असेही पुढे शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.

रसद पुरवून दंगल घडवणारा दुसरा एक वर्ग

मराठा आंदोलनात रसद पुरवणारा प्रामाणिक वर्ग ही होता, आणि रसद पुरवून दंगल घडवणारा दुसरा एक वर्ग होता. त्यामुळे प्रामाणिकपणाने ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली.

 त्या भाजी भाकरीला यश आलं आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली होती. ते सगळे उघडे पडले. जे सुरुवातीला अनेक नेते आहेत, नाव घेण्यात अर्थ नाही ते महाविकास आघाडीचे नेते आहेत, 

मोठ्या घराण्यातील मोठे आणि तरुण काही मंडळी आहेत, ज्यांनी कारण नसताना राजकारणात या आंदोलनाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला.

 दुर्दैवानं त्यांनी तरी असं करायला नको होतं, असं मला वाटतं, असंही पुढे शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे

Post a Comment

0 Comments