ब्रेकिंग न्यूज...महायुतीचे सरकार एकसंघ आणि मजबूत : माजी आमदार शहाजी बापू पाटील
सांगोला / तालुका प्रतिनिधी राज्यात सध्या सत्तेवर असणारे महायुतीचे सरकार एकसंध आणि मजबूत आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख नेते मंडळीत सुसंवाद आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राम लक्ष्मण आणि भरत या भावाप्रमाणे एकदिलाने आणि विश्वासाने काम करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे
होता. मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळातून या विषयावर तर्क वितर्क लढवले जात होते.
या विषयावर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य करताना राणे कुटुंबात मी अनेक वर्षे वावरलो आहे.
त्यांच्याच कुटुंबातील मी एक सदस्य असून त्यांच्या कुटुंबात कमालीची एकी आणि सुसंवादउपनेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल तर आहे ना..? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून पुढे येत
आहे. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय विरोधकांना जर उकळ्या फुटत असतील तर त्या क्षणभंगुर आहेत.
राणे बंधू मधील एकता कधीही भंग पावणार नाही असेही माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठासून सांगितले.
चौकट -
महाराष्ट्रातील जनताच आमची माय आणि बाप धाराशिव येथे बोलताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांचा बाप असल्याचा उल्लेख केला होता.
त्यांच्या या विधानाशी असहमती दर्शवत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाराष्ट्रातील जनता हीच महायुतीची माय आणि बाप असल्याचा दावा केला आहे.
मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद दिल्यानेच राज्यात महायुती सत्तेत आली असल्याचेही माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
0 Comments