खळबळजनक..ग्राहकांना धक्का! वीजबिल १३०० रुपयांवरून आले थेट ४ हजार रुपयांवर;
स्मार्ट मीटरबाबत तीव्र संताप; नागरिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात
स्मार्ट मीटरबाबत जिल्ह्यात विविध संघटनांनी आंदोलन उभारले असतानाच बुधगाव येथील ग्राहकाला सरासरी येणारे १३०० रुपयांचे वीजबिल स्मार्ट मीटर बसविल्यानंतर
थेट ४ हजार रुपये आले आहे. याबाबत सांगलीच्या सर्वपक्षीय कृती समिती व नागरिक जागृती मंचने संताप व्यक्त केला.
निवेदनाद्वारे संघटनांनी नागरिकांना स्मार्ट मीटर न बसविण्याचे आवाहन केले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरला सुरुवातीपासून सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून विरोध केलेला होता.
तरीसुद्धा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन महावितरण कंपनीने खासगीकरणाच्या माध्यमातून ग्राहकांना फसवून स्मार्ट मीटर काही ठिकाणी बसवलेले आहेत. ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्यांना आता बिले जनरेट होत आहेत.
बुधगाव मधील ग्राहकाचे मार्च व एप्रिल महिन्यातील बिल अनुक्रमे १ हजार १३० व १ हजार ३० अशा पद्धतीने आले होते. त्यावेळी जुने मीटर होते. मात्र, मे महिन्यातील बिल ४ हजारच्या घरात गेले आहे. बिल स्मार्ट मीटरनुसार आले आहे.
महावितरणकडेविरोधकरूनसदरमीटरकाढूनटाकण्यासाठीअर्जकरा
ज्या नागरिकांनी असे मीटर बसवलेले आहेत त्यांनी तत्काळ महावितरणकडे विरोध करून सदर मीटर काढून टाकण्यासाठी अर्ज करावा.
मीटर कोणते बसवावे, हा ग्राहकांचा अधिकार आहे.- सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच
0 Comments