ब्रेकिंग न्यूज! प्रत्येक गावात एक योजनादूत नेमला जाणार, युवकांना मिळणार दहा हजार रुपये मानधन;
१३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन; योजना दूत निवडीचे निकष
शासनाच्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार
असून सोमवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात ४६ हजार तर सोलापूर जिल्ह्यात ८६५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
७ सप्टेंबरपासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून येत्या १३ सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.
या योजन दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादू शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहित देतील.
योजना दूत निवडीचे निकष
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे,
उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाइल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बैंक खाते असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र तसेच अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला),
उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाइन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
0 Comments