google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजेवाडी तलावात दोन दिवसात पाणी दाखल होणार ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नाला यश

Breaking News

राजेवाडी तलावात दोन दिवसात पाणी दाखल होणार ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नाला यश

राजेवाडी तलावात दोन दिवसात पाणी दाखल होणार ;


माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नाला यश 

अजितदादांचे प्रशासनाला आदेश ; राजेवाडी नियमित भरून देण्याचे कार्यकारी संचालक श्री. कपोले यांच्याकडून मान्य 

शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812

सांगोला : तालुका प्रतिनिधी उरमोडी उपसा सिंचन योजना आणि जिहे काठापुर उपसा सिंचन योजना मधून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह 

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कपोले यांच्याकडे केली आहे. दरम्यान दिपकआबांच्या मागणीला यश आले असून दोनच दिवसांत उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार आहे.

 विशेष म्हणजे दरवर्षी नियमितपणे उरमोडी आणि जिहे काठापुर योजनेतून राजेवाडी तलाव भरून देण्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांनी मान्य केले आहे. 

उरमोडी आणि जिहे काठापूर उपसा सिंचन योजनेतून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास 

सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर, कटफळ, शेरेवाडी, बंडगरवाडी, चिकमहुद, दुधाळवाडी अचकदानी नरळेवाडी आणि वाकी या परिसरातील हजारो एकर क्षेत्राला राजेवाडी तलावातील पाण्याचा फायदा होतो. 

अनेक वर्षांपासून राजेवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात "पाणी आडवा, पाणी जिरवा" या संकल्पनेतून कामे झाल्याने राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरत नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते

 हा गंभीर प्रश्न घेऊन या परिसरातील गोवर्धन गोडसे, यशवंत नरळे, प्रताप नरळे, सोमनाथ नरळे व उपसरपंच सोमनाथ पुजारी आदींसह अन्य शेतकरी 

शिष्टमंडळाने याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांची भेट घेतली. याबाबत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन 

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगेचच संबंधित विभागाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना ताबडतोब उरमोडी उपसा सिंचन योजना

 आणि जीहे काठापूर उपसा सिंचन योजना यामधून राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील व परिसरातील

 शेतकरी शिष्टमंडळाने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. 

श्री कपोले यांनीही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन राजेवाडी तलाव भरण्यासाठी कार्यवाही सुरू केली. 

अवघ्या दोन दिवसात उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात दाखल होणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यातून आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

चौकट ; 

१) दरवर्षी राजेवाडी तलावाला मिळणार हक्काचे पाणी..! 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मागणीनंतर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यांना राजेवाडी तलावात नियमितपणे पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. 

त्यानुसार दरवर्षी आता राजेवाडी तलावात उरमोडी आणि जिहे काठापुर योजनेतून हक्काचे पाणी सोडण्यात येईल 

राजेवाडी तलावाला हक्काचे पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२) राजेवाडीच्या कालव्याचे लवकरच नूतनीकरण होणार...! 

इंग्रज काळापासून अस्तित्वात असणाऱ्या राजेवाडी तलावाच्या कालव्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. 

या कालव्यांचे लवकरात लवकर नूतनीकरण करून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी यावेळी दिपकआबांनी कार्यकारी संचालक श्री कपोले यांच्याकडे केली.

 यावर श्री कपोले यांनी तात्काळ राजेवाडीच्या कालव्यांचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आपल्या प्रशासनाला दिले आहेत. अनेक वर्षानंतर या कालव्यांचे नूतनीकरण होण्याचा मार्ग या निमित्ताने मोकळा झाला आहे.

Post a Comment

0 Comments