google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील टँकरचा खर्च ठेकेदाराकडून वसूल होणार; वेळ पडल्यास थेट गुन्हे दाखल करणार सीईओंचा इशारा; नेमकं प्रकरण काय आहे?

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील टँकरचा खर्च ठेकेदाराकडून वसूल होणार; वेळ पडल्यास थेट गुन्हे दाखल करणार सीईओंचा इशारा; नेमकं प्रकरण काय आहे?

सोलापूर जिल्ह्यातील टँकरचा खर्च ठेकेदाराकडून वसूल होणार; वेळ पडल्यास थेट गुन्हे दाखल करणार सीईओंचा इशारा; नेमकं प्रकरण काय आहे? 


जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची ज्या ठेकेदारांकडे कामे जास्त मंजूर आहेत;

 पण ते इतर ठेकेदारांकडून काम करून घेत असल्याचे निदर्शनास आल्याने सदरची कामे मुदतीत पूर्ण करून घेण्यास विलंब होत आहे.

त्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून संबंधित ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकली जाणार आहेत. 

शिवाय वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिला आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत सध्या जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची ५ पेक्षा जास्त कामे मंजूर असलेले ३७ ठेकेदार आहेत. या ३७ ठेकेदारांकडे जिल्ह्यात एकूण ४५५ कामे मंजूर आहेत;

पण हे ठेकेदार सदरची कामे ही स्वतः न करता इतर ठेकेदारांना कामे देऊन त्यांच्याकडून करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे या ठेकेदारांचे जलजीवन मिशन योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने पाणीपुरवठा योजनांची कामे दिलेल्या विहित वेळेत पूर्ण न होता उलट खूपच विलंब होत आहे.

त्यामुळे या ३७ ठेकेदारांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने लेखी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या नोटीसला संबंधित ठेकेदारांनी समर्पक असा वेळेत खुलासा न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून संबंधित ठेकेदारांची नावे काळ्या यादीत नाव टाकली जाणार आहेत.

वेळप्रसंगी त्यांच्यावर जिल्हा परिषद गुन्हे दाखल करणार

जिल्ह्यात सध्याच्या टंचाईसदृश परिस्थितीमध्ये ज्या गावास पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची वेळ आली तर संबंधित ठेकेदारांकडून त्या टँकरचा खर्च वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

 शिवाय वेळप्रसंगी त्यांच्यावर जिल्हा परिषद गुन्हे दाखल करणार आहे.-मनीषा आव्हाळे, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर

तोंडी व लेखी सूचना अन्यथा…

जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येत आहेत;

 परंतु सदरची झालेली जी कामे आहेत ती तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तेने असमाधानकारक आहेत.

 त्यामुळे संबंधित ठेकेदारांना तोंडी व लेखी सूचना देऊन पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्तेनी करावीत, याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments