google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात टप्प्याटप्प्याने खासगीकरण सुरुवात..”महाराष्ट्रात सर्वत्र गुजराती उद्योजक यांची वीज येणार ..

Breaking News

महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात टप्प्याटप्प्याने खासगीकरण सुरुवात..”महाराष्ट्रात सर्वत्र गुजराती उद्योजक यांची वीज येणार ..

महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात टप्प्याटप्प्याने खासगीकरण सुरुवात..”महाराष्ट्रात सर्वत्र गुजराती उद्योजक यांची वीज येणार ..

सद्या देशात केंद्र आणि राज्य सरकार गुजराती राजकारण पासून उद्योगजक अदानी आणि अंबानी यांनी आपला मोठा भक्तजन व्यापार ,देशात आपला व्यापार मजबूत करण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात टप्प्याटप्प्याने खासगीकरण  -कब्जा करण्यास सुरुवात झालेली आहे.

यानुसार आता मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीज वितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. विस्ताराचे वेध लागले आहेत.

मुंबईलगतच्या इतर भागांत वीज वितरण व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना अदानीने आखली असून केंद्रीय वीज कायद्यातील दुरुस्ती काही कारणांनी रखडली तरी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गाचा उपयोग करून नव्या भागांत विस्तारीकरण करण्याचा अदानी समूह यांनी सुरुवात केली आहे.

सद्या केंद्रात गुजराती मोदी ते जोडीला शहा असून जवळपास भारतीय जनता पार्टी एकहाती सत्ताधीश यांनी खाजगीकरण निमित्ताने देश संपत्ती-साधने लिलावात जोडीदार गुजराती अडाणी आणि अंबानी यांना वित्त कर्ज-पुरवठा,पासून सर्व दोघे विकतात अन दोघे खरेदी कब्जा करतात अशी जनतेत चर्चा आहे.

यानुसार आता मुंबई उपनगरातील वीज वितरण व्यवसायात जम बसवल्यानंतर महाराष्ट्रात महावितरणच्या परिसरात विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या 

अदानी समूहाने नवी मुंबई महानगरपालिका, मुलुंड-भांडुप, ठाण्यातील काही भाग आणि पनवेल, उरण, तळोजा आणि महाराष्ट्रच्या परिसरात वीज वितरणाचा समांतर परवाना मागण्यासाठी राज्य वीज नियमक आयोगाकडे दाखल केलेल्या अर्जावर लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.

आता महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात टप्प्याटप्प्याने खासगीकरण सुरुवात झाली असून

अदानी आणि अंबानी ग्रुप लवकरच आपला कब्जा महावितरणचे भांडुप परिमंडळ हे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत घरगुती वीजग्राहक आणि हजारो व्यावसायिक वीजग्राहक असलेला भाग आहे. नवी मुंबईचा परिसर कमी वीजहानी आणि घसघशीत महसूल देणारा असून वीज वितरण व्यवसायातील दुभती गाय आहे.

 राज्यातील अनेक परिमंडळात महसूल टंचाई भेडसावणाऱ्या महावितरणसाठी हा परिसर म्हणजे हक्काचा महसूल गोळा करून देणारा परिसर आहे. या भागातील वीज वितरण परवान्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लि. या कंपनीमार्फत राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे.

पुढील पाच वर्षांत किमान ५ लाख वीजग्राहक कंपनीकडे असतील असा अंदाज या अर्जात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात हरकती व सूचना दाखल करण्यासाठी पुढील ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

 लोकांनी दाखल केलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन सुनावणीनंतर राज्य वीज नियामक आयोग अदानीला नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, ठाण्याचा आणि पनवेल, उरणच्या काही भागात वीज वितरण परवाना देण्याबाबत निर्णय देईल.यानुसार आता रीतसर गुजराती सावकार बाबत नवीन वर्षांत या परवान्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments