सांगोला तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा : डॉ. बाबासाहेब देशमुख
वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
कोळा (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात अनेक भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या सर्व नुकसान ग्रस्तांचे पंचनामे तहसील कार्यालयाने सर्व तलाठी मार्फत तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा द्यावा आवाहल तातडीने जिल्हाधिकार्यांकडे पाठवावा असे आव्हान शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी चे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
सांगोला तालुका व परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने तुफान पावसामुळे फळबाग व घरांचे मोठे नुकसान झाले आहे उन्हाळी पिके सुपडा साफ झाली आहेत मका गहू हरभरा डाळींब यासह आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बळीराजा या पावसाने मेटाकुटीला आला आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे काही भागात गारपिटीचा पाऊस झालेला आहे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास पंचनामा संदर्भात फोन करावा सहकार्य मदत केले जाईल असे बाबासाहेब देशमुख यांनी शेवटी सांगितले.


0 Comments