अनिरुद्ध पुजारी यांची केंद्र शासनाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद, संस्थेच्या मँनेजमेंट कमिटीवर निवड !
संशोधन केंद्रात नवीन झालेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी संशोधन केंद्र पर्यंत पोहोचवणे ही कामे करावी लागणार
यामध्ये प्रामुख्याने पिकांवरील अजैविक ताण व त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो . सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंग मुळे सतत बदलते हवामान व त्याचा पिकावर होणारा परिणाम या विषयाला खूप महत्त्व आले आहे व या विषयी संशोधन करणे गरजेचे आहे .
प्रामुख्याने कमी जास्त होणारे व सतत बदलणारे तापमान , कमी -जास्त व अवेळी पडणारा पाऊस, तापमानातील अति फरक तसेच जमिनीतील व पाण्यातील वाढणारे क्षारांचे तसेच अवजड धातूंचे प्रमाण व त्याचा होणारा पिकांवरील परिणाम हे अभ्यासले जाते. पिकांवरील ताण कसा कमी केला जाईल व उत्पन्नात फरक येणार नाही याबाबत संशोधन केले जाते.

0 Comments