मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ही योजना 2024 पर्यंत सुरू ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. कॅबिनेटने पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण म्हणजे पीएमएवाय-जी मार्च 2024 पर्यंत जारी ठेवण्यात मंजूरी दिली आहे. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी कॅबिनेटच्या निर्णयाची माहिती दिली.
केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की, 2016 मध्ये ग्रामीण भागात सर्वांना घर या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला होता की, 2.95 कोटी लोकांना पक्क्या घरांची आवश्यकता आहे. यामध्ये मोठ्या संख्येत कुटुंबांना घरे देण्यात आली आहेत.
ठाकुर म्हणाले, उर्वरित कुटुंबांना सुद्धा घरे मिळू शकतील, यासाठी ही योजना 2024 पर्यंत जारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी वक्तव्यानुसार, या योजनेंतर्गत उर्वरित 1.55 कोटी घरांच्या बांधकामासाठी 2.17 कोटी रुपये येतील.
ज्यामध्ये केंद्राची भागीदारी 1.25 लाख कोटी रूपये तसेच राज्याची भागीदारी 73,475 कोटी रूपये असेल. या अंतर्गत नाबार्डला अतिरिक्त व्याजाच्या परतफेडीसाठी 18,676 कोटी रूपयांची अतिरिक्त गरज असेल.केन-बेतवा प्रोजेक्ट होईल लिंक
याशिवाय मोदी सरकारने केन-बेतवा लिंक प्रोजेक्टला मंजूरी दिली आहे. अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, 44,605 कोटी रुपयांच्या खर्चाचा केन बेतवा नदीजोड प्रकल्प 8 वर्षात पूर्ण केला जाईल. या राष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये केंद्र सरकारचे योगदान 90 टक्के असेल.

0 Comments