७ मोठी बातमी : राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे ऑक्टोबरपासून खुली होणार
मुंबई : राज्यातील मंदिरं ७ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत . नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आरोग्याचे नियम पाळून मंदिरे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे . मुख्यमंत्री यांनी म्हटलं की , दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे . मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत . सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल . चेहऱ्यावर मास्क , सुरक्षित अंतर , जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे . धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये . असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे .
0 Comments