राज्यातील शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा !
राज्यातील शिक्षण विभागात एकूण 2 हजार 62 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे . यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3 हजार 902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केलेली आहे . याबाबत स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच घोषणा केलीय . त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे . शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , “ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2 हजार 62 रिक्त पदांसाठी 15 हजार 123 पसंतीक्रमावर 3 हजार 902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे .
उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा ! "पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती सरळसेवेने करण्याची मागणी . दरम्यान , आदिवासी समाजातील डी.एड , बीएड धारक विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीसाठी 23 ऑगस्टला पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते . पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले .विद्यार्थ्यांनी केले होते उपोषणं 1662 जागा सरळसेवेनं भरा पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रियेद्वारे भराव्यात ,
अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली . वारंवार पत्रव्यवहार , निवेदने , आंदोलने करून सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे आदिवासी डीटीएड , बीएड कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आले . जिल्ह्यातील आदिवासी समाजातील डीटीएड , बीएड धारक विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले . उपोषणात मोठ्या संख्येने विद्यार्थिनींचा सहभाग होता . - राज्यात शिक्षकांची 40 हजार पदे रिक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार , आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत . शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या भरणार आहे . पहिल्या टप्प्यात 6100राज्यात शिक्षकांची 40 हजार पदे रिक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार , आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत . शिक्षण विभाग टप्याटप्याने या जागा भरणार आहे . पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत .
0 Comments