google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 किराणा मालाची दुकानं आता फक्त ४ तासच खुली राहणार ..आरोग्यमंत्री राजेश टोपे

Breaking News

किराणा मालाची दुकानं आता फक्त ४ तासच खुली राहणार ..आरोग्यमंत्री राजेश टोपे

 निर्बंधांबाबत मोठी बातमी; किराणा मालाची दुकानं आता फक्त ४ तासच खुली राहणार गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं निर्बंध घातले आहे. परंतु अत्यावश्यक सेवा आणि किराणामाल खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे.


दरम्यान, निर्बंध घालण्यात आले असले तरी रस्त्यांवर वर्दळही काय आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.किराणाच्या नावाखाली बाहेर पडणं योग्य नाही – आरोग्यमंत्री किराणाचं दुकान दिवसभर उघडं असल्यामुळे अनेक जण किराणाच्या दुकानाच्या नावानं विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतायत. त्यासाठी अजित पवार यांनी सकाळी ७ ते ११ या कालावधीत किराणामालाची दुकानं उघडी ठेवूया असं सांगितलं. कारण दिवसभर किराण्याच्या नावाखाली बाहेर पडणं योग्य नाही. त्यामुळे अशा स्वरुपाचा बद केला पाहिजे. विशेष म्हणजे वरुनच तो बदल व्हावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर तो बदल ठेवू नये, असा निर्णय सर्वानुमते झाला,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments