google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर क्राईम : रेखा अन् दादासाहेबाचं सूत जुळलं; तुरुंगातून परतलेल्‍या पतीलाच दोघांनी संपवलं,

Breaking News

सोलापूर क्राईम : रेखा अन् दादासाहेबाचं सूत जुळलं; तुरुंगातून परतलेल्‍या पतीलाच दोघांनी संपवलं,

 सोलापूर क्राईम : रेखा अन् दादासाहेबाचं सूत जुळलं; तुरुंगातून परतलेल्‍या पतीलाच दोघांनी संपवलं, मोहोळ पोलिसांचा कौशल्याने तपास


बसवेश्वरचं नुकतचं लग्न झालेलं होतं. मात्र, एका गुन्ह्यात सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. घरात पंचवीशीतील पत्नी रेखाला सोडून तुरुंगात जावं लागलं. पती तुरुंगात गेल्यानंतर चारा छावणीतील दादासोबत रेखाचं सूत जुळलं. दादा रेखाच्याच गावातील असल्यामुळं दोघांचं प्रेम वाढीस लागलं. आता आपला पती तुरुंगातून येणार नाही, असं समजून दोघांनी प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. दादा बिनधास्त रेखाच्या घरी येऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवू लागला. पण, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने बसवेश्वराला तुरुंगातून सोडून दिलं. तो घरी आला. त्याला पत्नीचं प्रेम प्रकरण लक्षात आलं. तो रेखा आणि दादा दोघांच्यामध्ये अडथळा ठरू लागला. त्याला संपविल्याशिवाय आपल्या एकत्र येता येणार नाही म्हणून दादाला एक प्लॅन सुचला आणि बसवेश्वराचा काटा काढला. बसवेश्वराच्या मृत्यूनंतर मोहोळ पोलिसांनी चाणाक्षपणाने या घटनेच्या केलेल्या तपासाने किचकट गुन्ह्याचा उलगडा होऊ शकला. या तपासाबद्दल मोहोळ पोलिसांची सध्या कौतुक होत आहे.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या सारोळे गावातील बसवेश्वर तीन वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात अडकला आणि त्याला सश्रम कारावासाची शिक्षा झाली. तो तुरुंगात गेल्यानंतर नुकतंच लग्न झालेल्या रेखाला एकटं-एकटं वाटू लागलं. मजूरी करून घरातील जनावरं सांभाळून रेखा घरात राहू लागली. जनावरांच्या चाऱ्यासाठी रेखा चारा छावणीकडे जात होती. तिथेच दादासाहेबाशी रेखाची ओळख झाली. सुदैवाने दादासाहेब रेखाच्याच गावातील असल्याने दोघेहा एकमेकांना ओळखत होते. आणि दोघेही एकाच वयाचे होते. त्यांची ओळख हळूहळू वाढू लागली. दादासाहेब तिच्यावर प्रेम करू लागला होता. त्यामुळे तो सतत तिच्या मागावर असायचा. 


सुरुवातीला रेखाना दादासाहेबाकडे दुर्लक्ष केले. मात्र, तो हरला नाही. त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले. हळूहळू रेखाच्याही मनात दादाबद्दल आकर्षण निर्माण झाला. तिचा एकटापणा दूर करण्यासाठी दादासाहेब आपली सोबत करू शकतो असं रेखाला वाटू लागलं. एक दिवस तो रेखाच्या घरात सरल शिरला आणि रेखाला मिठीत घेतले. मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तुझ्याशिवाय काही सुचत नाही, असे म्हणत तो तिला आपल्या बाहुपाशात घेतले. सुरुवातीला विरोध करणारी रेखा हळूहळू दादासाहेबाला प्रतिसाद देऊ लागली. शरीरसुखासाठी आसुसलेले दोघे जगाची फिकिर न करता, समाजाचे सर्व नियम झुगारून एकमेकांच्या मिठीत शांत झाले. नंतर शरीरसुखासाठी दोघांचं एकत्र येणं नित्याचं झालं. तोपर्यंत ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली होती. दरम्यान, कोरोनाचा कहर वाढला. जिकडेतिकडे त्याचे परिणाम जाणवू लागले. त्यामुळे तुरुंगातील कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून तुरुंग पोलिस प्रशासनाने काही कैद्यांना पॅरोलवर सोडले. त्यात बसवेश्वरही होता. तो आनंदाने आपल्या घरी आला. पण, तो तुरुंगातून घरी आल्याला आनंद रेखाच्या चेहऱ्यावर दिसला नाही, ही बाब बसवेश्वरला लक्षात आली नाही. पण, त्याने दुर्लक्ष केले. तुरुंगाची हवा खाऊन आलेला बसवेश्वर नाकाच्या सरळ रेषेत चालू लागला. कोणच्या अध्यातमध्यात नाही. सर काम ते घर आणि घर ते काम, अशी त्याची दैनंदिनी सुरू झाली. हळूहळू रेखा कुणाशीतरी तासन् तास बोलत राहते. ही बाब बसवेश्वरला खटकली. त्यात गावकऱ्यांनीदेखील रेखाचे दादासाहेबाशी अनैतिक संबंध आहेत, हे कानावर घातले. त्याने तो बिथरला. त्याने रेखाला आणि दादासाहेबाला बजावले. त्याने दादासाहेबासास धमकी दिली. रेखा आणि दादासाहेब यांच्या प्रेमात बसवेश्वर अडथळा होऊ लागला. बसवेश्वरला कसं हटवायचं, याचा प्लॅन ते दोघे करू लागले. त्यात दादासाहेबाला एक कल्पना सुचली की, बसवेश्वरचा अपघात घडवून आणायचा आणि त्याला अज्ञाताने धडक देऊन मृत्यू झाला, अशी नोंद होऊ द्यायची. नंतर आपल्या दोघांचा रस्ता मोकळा. ही कल्पना रेखालाही आवडली. ठरल्याप्रमाणे दादासाहेब पुण्याला आला आणि एका ट्रान्सपोर्ट कंपनी ड्रायव्हर म्हणून कामाला लागला. तो आपल्या गावाकडील मार्गाने जाण्याची संधी कधी मिळते, याच्या शोधात होता. त्याला ती संधी चालून आली. २१ मार्चला कर्नाटकात टॅंकर घेऊन जाण्याची संधी मिळाली. २२ मार्चला आपल्या कामावर नेहमीप्रमाणे जाण्यासाठी बसवेश्वर आणि त्याचा मित्र मारुती करंडे दुचाकीवरून सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंब येथे कामावर गेल्याची माहिती रेखाने दादासाहेबाला दिली. ठरल्याप्रमाणे कामावरून सुट्टी झाल्यानंतर दुचाकीवरून घरी परतणाऱ्या बसवेश्वरची वाट दादासाहेब पाहू लागला. बसवेश्वर आणि मारुती कामावरू घरी परतताना दबा धरून बसलेला दादासाहेबाने टॅंकर चालू केला आणि सरळ बसवेश्वराच्या दुचारी भर वेगात येऊन जोरदार धडक दिली. त्यामध्ये बसवेश्वर दुचाकीवरून खाली पडला अन् तिच संधी साधत दादासाहेबाने बसवेश्वराच्या अंगावरून ट्रक घातला. त्यात त्याचा जागीत मृत्यू झाला. बसवेश्वराचा मित्र मारूती गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार अविनाश शिंदे पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत असताना शिंदेंना शंका आली की, दुचाकी ही डांबरी सोडून साईड पट्टीच्या एकदम खालच्या बाजूने जात होती. मग, टॅंकर इतका खाली कसा आला, याचा विचार करत असताना ट्रान्सपोर्ट कंपनीतून टॅंकरचालकाचे नाव समोर आले. हा टॅंकरचालक बसवेश्वराच्या गावचाच असल्याची बाब उघड झाली आणि पोलिसांची संशय आणखी बळावला. पोलिसांनी दादासाहेब करंटे यांच्याबद्दल गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा गावकऱ्यांकडून रेखाचे आणि दादासाहेबाचे प्रेमप्रकरण पोलिसांसमोर आले आणि स्पष्टपणे बसवेश्वरच्या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी रेखाला विचारले की, या अपघाताबद्दल काही तक्रार आहे का? कुणावर संशय आहे का? रेखाने स्पष्टपणे नाही म्हणून उत्तर दिले. तिच्या या उत्तरानेच दोघांचा प्लॅन पोलिसांच्या लक्षात आला. मोहोळ पोलिसांनी रेखा आणि दादासाहेब याला ताब्यात घेतले. त्यांनी कसून चौकशी सुरू केली. तेव्हा दोघांनी कबूली दिली की, बसवेश्वर आमच्या प्रेम प्रकरणात अडथळा निर्माण करत होता. त्यामुळे आम्ही दोघांनी त्याला कायमचाच संपविण्याचा विचार केला. गुन्हा कबूल केल्यानंतर दोघांवर विविध कलमं मोहोळ पोलिसांनी लावली. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी खापरे करत आहेत.

Post a Comment

0 Comments