google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पित्याला मुलींच्या चारित्र्यावर होता संशय घेतला असा निर्णय

Breaking News

पित्याला मुलींच्या चारित्र्यावर होता संशय घेतला असा निर्णय

 पित्याला मुलींच्या चारित्र्यावर होता संशय घेतला असा निर्णय शंकेचे भूताने एकदा मनात घर केले की मग त्या भुताला मनातून काढून फेकणे शक्य नसते. मनातील या भुतामुळे मनुष्य असे काही निर्णय घेतो की त्याला आयुष्यभर पस्तावे लागते. अशीच घटना सोलापूर जिल्हयातील करमाळा तालुक्यातील सावळी गावात घडली आहे


. येथे राहणाऱ्या एका पित्याला आपल्या मुलींच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने रात्री अंगणात झोपलेल्या आपल्या मुलींच्या अंगावर ट्रक चढवून त्यांची हत्या केली आणि स्वतःही ट्रक खालीं येऊन जीव दिला.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार इंदोरी ता मावळ येथे राहणाऱ्या भरत भराटे यांच्या कडे ट्रक होता. त्या पासून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. त्यांना पत्नी आणि तीन मुली होत्या. त्यापैकी दोन मुलींचे प्रेमप्रकरण चालू आहे असा त्यांना संशय होता. त्यामुळे आवळे नाव बदनाम होईल असे त्यांना वाटत होते. त्याने ही बाब पत्नी सपना हिला अनेक वेळा बोलून दाखवली होती.घटनेच्या दिवशी उन्हाळ्याचे दुवस असल्याने सगळे बाहेर झोपले होते. मुलींच्या प्रेमप्रकारणाच्य संशयाच्या भुताने पछाडलेल्या भरत याने रात्री १ वाजता आपला ट्रक क्र. एमएच १२/ एचडी १६०४ सुरू केला आणि अंगणात झोपलेल्या नंदिनी भरत भराटे (१९) आणि वैष्णवी भरत भराटे यांच्या अंगावरून नेला आणि स्वतः ही त्या ट्रक च्या समोर उडी मारून जीव दिला. विशेष म्हणजे ते धार्मिक प्रवृत्तीचे होते. वेटाळात होणाऱ्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभाग घ्यायचे. त्यांच्या या कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments