google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र गारठणार! राज्यात दोन दिवसांत तापमानात आणखी घट होणार

Breaking News

महाराष्ट्र गारठणार! राज्यात दोन दिवसांत तापमानात आणखी घट होणार

 महाराष्ट्र गारठणार! राज्यात दोन दिवसांत तापमानात आणखी घट होणार

 महाराष्ट्र,नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. पुढील दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे.थंडीत बाहेर पडू नका, नाहीतर येईल हार्ट अटॅक! डॉक्टरांनी केलं सतर्क देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. 

त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तर मंगळवारी (10 जानेवारी) थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

 हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे.

 पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सफदरगंजमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. सफदरगंजमध्ये 1.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Post a Comment

0 Comments