google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणा संदर्भात पारदर्शक निर्णय घेणे बाबत

Breaking News

ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणा संदर्भात पारदर्शक निर्णय घेणे बाबत

 


उपरोक्त विषयास अनुसरून ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदान होवून त्याचा निकाल ही लागला आहे . परंतू निवडणूक आयोगा कडून निवडणूकी नंतर आरक्षण सोडत २७ तारखेला जाहिर केली जाणार आहे . परंतू तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूकीत आघाड्या , राजकीय युत्या या पध्दतीने निवडणूका झाल्या . काही ठिकाणी बहुसंख्य सदस्य एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा आघाडीचे आले व विरोधात अल्प सदस्य निवडून आले . तसेच काही ठिकाणी राजकीय पक्ष व आघाडी यांच्यामध्ये बहुसंख्य सदस्य निवडून आले तरी , त्यांच्याकडे आरक्षण प्रवर्गातील एक ही सदस्य निवडून आला नाही . म्हणून आरक्षण पडल्यास अल्प सदस्य निवडून आलेल्या गटाला किंवा राजकीय पक्षाला नाईलाजास्तव , सरपंच पद मिळेल या भिती पोटी ते आरक्षण सोडत प्रक्रियेत राजकीय दबाव आणण्याची शक्यत नाकारता येत नाही . असे घडल्यास आरक्षीत सदस म्हणून निवडून आलेल्या सदस्यांवर एक प्रकारचा अन्यायच होणार आहे . शिवाय काही गांवात वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये सरपंच आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी पडलेच नाही , तरी आपण वरील बाबींचा विचार करून सरपंच पदाचे आरक्षण पारदर्शक पध्दतीने जाहिर करावे . आपल्या आरक्षण सोडत जाहिर पध्दतीत कांही संशयीत बाबी लक्षात आल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) , दलित सामाजिक संघटना व आंबेडकरी राजकीय पक्ष यांना सोबत घेवून मोर्चा , उपोषण , रस्ता रोको असे लोकशाही पध्दतीचे आंदोलन केले जाईल . सदर आंदोलनाने शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला पूर्णतः आपले प्रशासन जबाबदार राहिल

Post a Comment

0 Comments