धक्कादायक घटना... सांगलीत घरजागेच्या वादातून महिलेचा निघून खून..
सांगली:- घरजागेच्या वादातून भावकीतीलच तीन तरूणांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
संगीता यांच्या पतीचे काही वषापूर्वी निधन झालेआहे. मासाळ कुटुंब मूळचे जत तालुक्यातील बाज येथील आहे. सांगलीत वानलेसवाडी येथे त्या गेल्या अनेकवर्षापासून स्थायिक आहेत.
संगीता यांच्या भावकीतीलचसंगीता यांच्या भावकीतीलच काही लोक वानलेसवाडी येथे त्यांच्या घराजवळ राहण्यास आहेत. वानलेसवाडी येथील जागेवरून त्यांचा भावकीतील काही लोकांशी वाद सुरू होता.
मुलगा किरण जेवण करून घराबाहेर गेला होता. संगीता जेवण करत असताना रविवारी दुपारी संगीता यांचा हल्लेखोरांनी कोयत्यासह अन्य धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला.
संगीता यांच्या मान, डोके, चेहऱ्यावर गंभीर वार झाले. त्या थारोळ्यात रक्ताच्या पडल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केले.संगिता यांच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.विश्रामबाग पोलीसाकडू हल्लेखोराचा शोध सुरू आहे.


0 Comments