google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चारित्र्याच्या संशयावरुन पतीने क्रुरतेचा कळस गाठला, पत्नीला आता आरशासमोर जायलाही वाटते भीती सोलापूर जिल्हा हादरला

Breaking News

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने क्रुरतेचा कळस गाठला, पत्नीला आता आरशासमोर जायलाही वाटते भीती सोलापूर जिल्हा हादरला

 चारित्र्याच्या संशयावरुन पतीने क्रुरतेचा कळस गाठला,

पत्नीला आता आरशासमोर जायलाही वाटते भीती सोलापूर  जिल्हा हादरला 

सोलापूर : पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरुन  एका पतीने क्रुरतेचा कळस गाठला. नराधम पतीने पत्नीबरोबर केलेल्या कृत्याने सोलापूर  जिल्हा हादरला आहे.

याप्रकरणी पोलिसांत  तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पती फरार आहे. पोलिसांनी पथकं तैनात केली असून त्याचा शोध घेतला जात आहे. सोलापूरमधल्या नविन विडी परिसरात ही घटना घडली आहे. 

काय आहे नेमकी घटना?

पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर पीडित महिलेची 2015 मध्ये अकिल सय्यद नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. 

अकिल हा विवाहित होता, पण त्याने पीडित महिलेपासून ही गोष्ट लपवून ठेवली. त्यानंतर 2019 मध्ये आरोपी अकिलने पीडित महिलेशी लग्न केलं. पीडित महिलेला पहिल्या पतीपासून तीन मुलं आहेत. 

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पीडित महिला नोकरीच्या शोधाक पुण्यात गेली. पण काही दिवस पुण्यात राहिल्यानंतर ती पुन्हा सोलापूरला आपल्या घरी परतली. पण पुण्याहून परतल्यापासून अकिल तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. 

तिला मारहाण करणं, शिविगाळ करणं हे प्रकार दररोजचे होऊ लागले. पण घटनेच्या दिवशी आरोपी अकिलने क्रुरतेचा कळस गाठला. त्याने पीडित महिलेला मारहाण करत चाकूने तिचा कानच कापून टाकला. 

यानंतर तो फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तिचाई आणि इतर नातेवाईकांनी तात्काळ छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालायत दाखल केलं. डॉक्टरांनी घटनेची दखल घेत तातडीने उपचार करत तिच्या कानावर शस्त्रक्रिया केली. 

याप्रकरणी आरोपी अकिल सय्यदविरोधात सोलापूरमधल्या वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments